हापूस आंबा - फळांचा राजा

हापूस आंबा हा फळांचं राजा आहेत्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.  त्याचे कारण तसेच आहे.  आंबा ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहेआंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे  आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.

आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतातआंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजतेत्या मोहोराचा सुद्धा एक मंद  असा सुवास असतोह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतातकोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू कुहू करून गाणी म्हणत असतो  हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा त्याला  कैरी म्हणून ओळखतातत्याचे सुद्धा विविध उपयोग आहेत.

हापूस आंब्याची पदार्थ

 कैरी पासून मुरंबा जाम,  जेलीचॉकलेट्सपन्हेलोणचेसरबत बनवतात तसेच जेवणात विविध भाज्या व माश्याचे सार ह्या मध्ये कैरी घातली  जाते त्यामुळे त्या जेवणाची लज्जत वाढतेकैरी मुळे आजारी माणसाच्या तोंडाला चव येतेहि कैरी जेव्हा पिकली जाते तेव्हा त्याला आंबा म्हणतात.

आंब्याच्या अनेक जाती आहेत.  त्याचे वैशिष्ट्य असे कि प्रत्येक प्रांतात त्याची चव  रंग रूप ह्यात वेगळे पणा असतोदक्षिण भारतउत्तर भारतपश्चिम भारतप्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहेआंब्याचा रंग हा  मोहक पिवळा परंतु वेगवेगळ्या आंब्याच्या जाती प्रमाणे त्याच्या रंग छटा बदलतात

तोतापुरीनीलमदशहरीपायरीरायवळलंगडारूमानियाहापूसबाल्साल्ड आंबाअश्या एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेतसर्वात लोकप्रिय आंब्याची जात आहे ती म्हणजे हापूस.  कोकणातील हापूरस आंब्याची चव हि अतिशय अप्रतिम असतेहापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहेकोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय

त्याच्या चवीने अख्या जगाला वेड लावले आहेत्याची चव इतर कोणत्याही आंब्याच्या फळाला येत नाहीकोकणाखेरीज जरी इतर कुठेही ह्या फळाची लागवड केली तरीही ह्याच्या सारखी चव नाही म्हणून तर ह्याला कोंकण चा राजा म्हणून ओळखतातअसे म्हणतात कि आंबा हा अक्षय तृतीया पासून खायला सुरवात करतात

कोकणातील हापूस आंबा हा आजमितीस सात समुद पार पोहचला आहेहापूस आंब्याला आखाती देशपश्चिमेकडील देश येथे प्रचंड मागणी आहे.  आणि ह्या आंब्या मुळे देशाचे परकीय चलन सुद्धा वाढण्यास मदत होते.  आंबा ह्या फळांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहेकारण ह्या फळाची लागवड ग्रामीण भागात एक उपजीविकेचे साधन आहे.

आंब्या मुळे गृह उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातोआंबा ह्या फळापासून आमरसजाममँगो मिल्क शेकआईसक्रीमआंबा पोळीआंबा बर्फीवडी  बनवली जातेहे सर्व उद्योग जिथे आंब्याचे उत्पन्ने मिळते तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतोआमरस पुरी हा तर अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे

संपूर्ण भारतात तो चवीने खाल्ला जातोतसेच आंब्याच्या हंगामात आमरस पुरी ने एक  प्रकार भारतीय मेजवानीत  मानाचे स्थान पटकावले आहे,

आंब्या मध्ये अनेक गुणधर्म आहेतत्यात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहेतसेच आंबा हा शक्तिवर्धक आहेआंब्यात अ आणि क जीवनसत्व आहेतसेच आंबा त्वचा आणि नेत्र विकार उपयोगी आहेआंब्याच्या झाडांची पाने सुद्धा औषधी आहेत.

हापूस आंबा 

काही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडू फुलांमध्ये ओवून घराच्या मुख्य दरवाज्याला लावतातआंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातोतसेच आंब्याच्या झाडांचे लाकूड सुद्धा फर्निचर साठी वापरतातअसा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.

हापूस आंबा कसा ओळखावा

कोकणातील सिंधुदुर्गरत्नागिरीरायगडठाणेआणि पालघर ह्या पाच जिल्ह्यातल्या आंब्यालाच ह्यापुढे हापूस आंबा असे नाव लावता येणार आहेहे साध्य झाला आहे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिला आहे.

हापूस आंबा किंमत

खऱ्या हापूस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते कर्नाटक हापूस आंब्याची किंमत ही नेहमी स्वस्त असते पण चवीत खूप खराब असते.

हापूस आंब्याची वैशिष्ठ

हापूस आंब्याचा आकार हा विशिषष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो. आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.    

खरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.

ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,

देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq